फॅसिझम - भांडवलशाहीमुळे देशाची वाटचाल वेगळ्या मार्गावर : हर्षवर्धन सपकाळ

Edited by:
Published on: March 16, 2025 15:27 PM
views 50  views

सावंतवाडी : फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर चालला आहे. त्यामुळे देशाची संस्कृती,परंपरा व विचारांचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात काॅग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहूल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हाच चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल असा आशावाद काॅग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. 

फॅसिजम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या मार्गावर चालला आहे, त्यामुळे देशाची संस्कृती,परंपरा व विचारांचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या काळात काॅग्रेस आक्रमकतेने लढणार आहे. राहूल गांधी हा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पटलावर असून भविष्यात हाच चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरेल असा विश्वास काॅग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे व्यक्त केला.तर भाजपाने मंत्री नितेश राणे यांना समाजामध्ये धार्मिक स्थळ निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात ठेवले आहे. शिवाय या कामासाठी त्यांना वेगळा पगारही दिला जात आहे अशी टीकाही श्री सपकाळ यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. सपकाळ यांनी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौरा केला या ठिकाणी कार्यकर्त्यांची मेळाव्याच्या माध्यमातून ते संपर्क साधणार आहे आज सावंतवाडी येथे ते दाखल झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काँग्रेसचे नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधीस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड.दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील अजिंक्य देसाई जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, ॲड.दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर राघवेंद्र नार्वेकर महेंद्र सांगेलकर आधी उपस्थित होते. 

ते म्हणाले, काँग्रेस ही निरंतर संघटना आहे वेगवेगळ्या पातळीवर या संघटनेचे कार्य सुरू आहे, म्हणून आजही काँग्रेस जिवंत आहे. सद्यस्थितीत ही संघटना कठीण काळातून जात आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र असे असले तरी काँग्रेस ही नेहमी संघर्षातच राहिले असल्याने त्यांना संघर्षाची सवय आहे सुरुवातीला इंग्रजांशी केलेला संघर्ष आणि त्यानंतर अन्य काही संघर्ष हे अख्ख्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे निश्चितच या संघर्षातून काँग्रेस बाहेर पडेल. सध्या देशात फॅसिजम आणि भांडवलशाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे देश एका वेगळ्या मार्गाने चालला असून, देशाची पीछेहाट यातून झाले आहे हे पीछेहाट संस्कृतीची परंपरेची आणि विचारांची आहे आणि या सर्वांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस निश्चितच आक्रमकपणे लढणार आहे. यासाठी काँग्रेसचे विचारधारा घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधी हा चेहरा लोकांच्या पटलावर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा चेहरा काँग्रेससाठी आशेचा किरण ठरणार आहे. ते पुढे म्हणाले नारायण राणे हे सत्तेशिवाय जगू शकत नाही, आज ते आणि त्यांचे पुत्र ज्याप्रमाणे खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे यातून त्यांची पातळी दिसून येते एकूणच त्यांचे बोलणे हे अशोभनीय असून एक प्रकारे कोकणचा अपमानच म्हणावा लागेल तर दुसरीकडे मंत्री नारायण राणे हे ज्याप्रमाणे हिंदुत्वावर बोलत आहे ते पाहता समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजपाने त्यांना मंत्रिमंडळात ठेवले आहे शिवाय याच गोष्टीचा त्यांना वेगळा पगारही दिला जात आहे. लाडक्या बहिणीच्या नावाखाली निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी जनतेला फसवण्याचे काम केले आहे गरज सरो वैद्य मरो अशी त्यांची नीती आहे आज कितीतरी लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभापासून त्याने बाद ठरवले आहे या योजनेसाठी कुठल्याच प्रकारची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केलेली नाही शिवाय उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असून तो पूर्णपणे चुकीचा आहे. शक्तीपीठला काँग्रेसचा विरोधच

काँग्रेस सक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरुवातीपासूनच आहे मुळात कोल्हापुर व सिंधुदुर्गातून जाणाऱ्या या मार्गामुळे अनेक शेतकरी उध्वस्त होणार आहे या मार्गाची गरज नसताना हा महामार्ग केला जात आहे रस्त्याच्या माध्यमातून भांडवलदारीचं कारस्थान आखल जात आहे म्हणूनच या प्रकल्पाला आमचा विरोध राहील असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.