
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ अर्थात महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या रक्षाबंधन उत्सवाच्या औचित्यावर महाराष्ट्र प्रदेश भाजपने मान प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवरून १०० याप्रमाणे एकूण १ कोटी राख्या आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठविण्याचे एक विशेष अभियान नियोजित केलेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या नाविन्यपूर्ण अश्या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण ९२१ बूथवरून प्रत्येकी किमान १०० राख्या अशा एकूण १.०० लाख राख्यांचे लिफाफे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येणार आहेत.त्यानंतर एका विशेष कार्यक्रमात या सर्व राख्या देवभाऊंच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी भाजपाचे अभियान राबविण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपाच्या कार्यालयात कार्यशाळा पार पडली त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी अभियानाच्या संयोजक महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सरचिटणीस रणजित देसाई, प्रसन्ना देसाई,सुहास गवंडळकर , वृंदा गवंडळकर आदी उपस्थित होते.
सावंत यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,दिनांक ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान हे अभियान संपन्न होणार आहे. जिल्हा भाजपाने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री मान नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा तसेच मंडल निहाय समित्यांचे गठण केलेले आहे.महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर आणि जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे या अभियानाचे जिल्हा संयोजक असणार आहेत.त्याचप्रमाणे प्रत्येक मंडलात दोन संयोजक नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद,पंचायत समिती,शक्तीकेंद्र आणि बूथस्तरावर या अभियानाचे नियोजन आजच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक स्वरूपात मासिक भेट सुरू केल्याने समस्त महिला वर्गात एक समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे.महिला भगिनींना आत्मनिर्भर आणि सन्मानित करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देवाभाऊना एक राखी आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठवणार आहेत.
यासाठी जिल्हा भाजपकडून एक विशेष लिफाफा घरोघरी देण्यात येणार असून त्यामध्ये भगिनींनी आपल्याकडील राखी/दोरा आणि एक कागदावर दोन ओळीचा शुभसंदेश लिहून त्यावर आपल्या नाव पत्ता नंबर सह भाजपा कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करतील,त्यानंतर त्या जिल्हा कार्यालयात जमा करण्यात येतील. भारतीय जनता पार्टीकडून असे आवाहन करण्यात येते की भाजपा कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोचतीलच पण ज्या भगिनींशी संपर्क होऊ शकणार नाही,अश्या भगिनींनी आपल्या तालुक्यातील भाजपा कार्यालयात आपली राखी जमा करावी आणि देवाभाऊसाठी रक्षाबंधन भेट द्यावी.
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रदेश स्तरावर महत्त्वाकांक्षी अशा संपर्क अभियानाला सुरुवात केलेली आहे.अलीकडेच देवेंद्रजींच्या वाढदिनी २२ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी १०८८ मंडलात ७८३१३ बॉटल इतके विक्रमी रक्त संकलन केले,या विक्रमाची जागतिक स्तरावर नोंद झाली.असेच हे अभियानही विक्रमी असणार आहे.