नाधवडेतील युवकाच सर्पदंशाने निधन

Edited by:
Published on: April 14, 2024 14:58 PM
views 1019  views

वैभववाडी : नाधवडे चारवाडी येथील आशिष गुरव (वय २७) या तरुणाचा सर्पदंशाने शनिवारी (ता १३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. आहे. या घटनेनंतर  नाधवडेसह परिसरामध्ये हळहळ होत आहे. 

      आशिष हा मोटर पंप दुरुस्तीची कामे करायचा.आठ दिवसांपूर्वी रात्री तो स्वतःच्या शेतीचा पंप सुरू करण्यासाठी शेतात गेला होता.या दरम्यान त्याला सर्पदंश झाला.त्याला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.त्याठिकाणी उपचार सुरू होते.मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला नातेवाईकांनी मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला.मुंबईत नेत असताना रत्नागिरी दरम्यान वाटेतच त्याची प्रकृती आणखीच खालावली.त्यामुळे त्याला चिपळूण डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र शनिवारी त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.      आशिष हा अत्यंत मनमिळावू व परोपकारी स्वभावाचा होता. नाधवडे सह वैभववाडी तालुक्यात इलेक्ट्रिशनच काम करायचा. शेतीपंप दुरुस्तीमध्ये त्याचा हातखंडा होता.  आशिष याच्या निधनाने त्याचे मित्रपरिवार, शेतकरी मित्र यांचा मधून हळहळ व्यक्त होत आहे. आशिष याची कौटुंबिक स्थिती बेताची असून स्वतःच्या कमाईतून तो कुटुंबाचे पालनपोषण  करीत होता. त्याच्या पश्चात आई ,वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.