कणकवली : कणकवली तालुक्यातील एका युवकाचं रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू झालाय. 45 वर्षांच्या सचिन बाळकृष्ण सावंत असं भिरवंडे इथं राहणाऱ्या या मुलाचं नाव आहे. चालत्या ट्रेनमधून उतरणं त्यांच्या जीवावर बेतलं.
केबल ऑपरेटर म्हणून सचिन काम करत होते. नुकतच त्यांना एअरटेल नेटवर्कचं काम मिळालं होतं. त्यासाठी लागणारी मशीन आणण्यासाठी ते मुंबईला गेले होते. दिवा स्टेशन इथं पोहोचल्यावर कोकणकन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला. याचा अंदाज घेत सचिन यांनी स्टेशन वर उतरण्याचा प्रयत्न केला. रेल्वेतून उतरताना ते बाहेर फेकले गेले. अतिरक्तस्त्रावामुळे सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. उपचारादरम्यानचं त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सचिन यांचं पार्थिव मुंबईहून भिरवंडे येथील गावी आणण्यात येणार आहे. सचिन यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होतेय