सावंतवाडी : श्रीक्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी शिंदे-फडणीस सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी च्यावतीने उद्या १४ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत 'धिक्कार मोर्चा' काढण्यात येणार आहे. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच वारकरी संप्रदायातील वारकरी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,पुंडलिक दळवी,महेंद्र सांगेलकर यांनी केल आहे.