रविंद्र चव्हाण यांच्यामुळे मार्गी लागला कबुलायतदार प्रश्न : संदिप गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: July 04, 2023 15:15 PM
views 289  views

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित  आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. मंत्रालय येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता आंबोली- गेळे, चौकुळ गावातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे अशी माहिती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी दिली. तर यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.