मालवण मुंबई रातराणी, मालवण बोरीवली गाड्या सुरु करा

काँग्रेस सेवादलाची मागणी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 22, 2024 10:48 AM
views 2450  views

मालवण : मालवण हे पर्यटन स्थळ आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण मध्ये येत असतात तसे मालवणहून थेट मुंबईजवळ जाण्यासाठी तसेच मालवणहून बोरीवली जवळ जाण्यासाठी एस. टी. बस नाहीत. खासगी गाड्याने मालवणातील प्रवासी प्रवास करीत आहेत. तसे ज्येष्ठ नागरिक महिला व इतर प्रवाशी याची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मालवण - मुंबई रातराणी आणि मालवण - बोरिवली या गाड्या चालू करण्यात याव्यात. फक्त गणेश चतुर्थीसाठी १५ दिवसासाठी गाड्या चालू न करता कायमस्वरुपी या गाड्या चालू करण्यात याव्यात. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. आगार प्रमुखांना याबाबत निवेदन दिले. 

यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, ओबीसी सेल अध्यक्ष बाळू अंधारी, युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, ममता तळगावकर, जेम्स फर्नांडीस, संदेश कोयंडे, लक्ष्मीकांत परुळेकर आदी उपस्थित होते.