सैनिक पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन, मुंबई यांच्याकडून गौरव
Edited by: विनायक गांवस
Published on: November 02, 2022 19:53 PM
views 431  views

सिंधुदुर्ग : जिल्हयात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंथा मर्या १. सिंधुदुर्ग या संस्थेला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन मुंबई यांच्याकडुन दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पनवेल मुंबई येथे राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अदिती सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. संस्था १९९१ मुहुर्तमेढ रोवलेल्या या संस्थेने रू. ३६,०००/- पासून १५० कोटीपर्यंत ठेवी गोळा करण्यापर्यंत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने व्हिजन २०२५ कार्यक्रमा अंतर्ग त २०० कोटी ठेवी गोळा करण्याचा संकल्प सोडला असून त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल अगदी जलद गतीने गुरु आहे. 


संस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील महिला सक्षम व्हावी व तीने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी महिला सवलीकरण व सक्षमीकरण या योजनेअंतर्गत महिलांना हिरकणी कर्ज योजनेद्वारे कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिक स्तोत्राचे एक हक्काचे दालन सुरू करून दिलेले आहे. या योजनेस सुरुवातीपासुनच प्रचंड प्रतिसाद लाभला असुन मोठ्या प्रमाणात महिला या आर्थिक दृष्टया सक्षम होत आहे.


 संस्था देत असलेल्या विविध ठेवीवर आकर्षक व्याजदर रौप्य धनलक्ष्मी वॉण्ड योजनेवर हमखास मिळणारी लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे. यामुळे जिल्हयातील ग्राहक संस्थेला पहिली पसंती देत आहेत. संस्था दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असुन संस्थेने चित्रकला, वकृत्व व ट्रि कमिनयुक्त दशावतार स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्यावसायिक मार्गदर्शन सर्वेष नाटय स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबविल्या असून सिंधुदुर्ग जिल्हायात सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी हातभार लावण्याचे काम संस्था करत आहे.


संस्थेच्या संचालकांनी घेतलेल्या भविष्य कालीन धोरणी निर्णयामुळे व कर्मचारी देत असलेल्या योगदानामुळे उत्कृष्ट व्यवस्थापन राष्ट्रीयकृत बँकाच्या तोडीला देण्यात येणा-या विविध योजनांची होत असलेली प्रभावीपणे अंमलबजावणी यामुळे संस्थेचा आलेख सतत चढता राहत आहे. संस्थेन जिल्हयात स्वतःची पत निर्माण केली असुन जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सहकार्याच्या जोरावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. संस्थेकडुन सोनेतारण कर्ज योजनेतून कर्ज घेणा-या सभासदाच्या कर्ज रक्कमेवरांवर आकर्षक भेटवस्तुही लाभ मिळु शकतो. यासाठी रु.५०००/- पेक्षा कर्ज रक्कमेची उचल होणे आवश्यक आहे.