बांदा : येथील दोडामार्ग - बांदा रस्त्याची साईड पट्टी खचल्याने पानवळ येथे तिहेरी अपघात झाला. यात एसटीसह टेम्पो मालवाहक, छोटा हत्ती या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून बांधकाम विभागाने यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बांदा दोडामार्ग राज्य महामार्ग हा साईडपट्टी खोदाईमुळे कमकुवत बनली असून या मार्गावर दररोज अपघात होत आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे धोकादायक बनला असून संबधित विभाग मोठ्या दुर्घटनेची वाट बघतेय का असा सवाल उपस्थित होत आहे.