महागाईवरून लक्ष वळवण्यासाठीच वैभव नाईकांवर कारवाई

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप
Edited by: विनायक गांवस
Published on: October 08, 2022 12:11 PM
views 197  views

सावंतवाडी : आमदार वैभव नाईक यांच्यावरील कारवाई हे राजकीय सुडाचं षडयंत्र आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे. प्रचंड महागाईने जनता त्रस्त झाली असताना जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार घडत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. आमदार वैभव नाईक आपण खंबीर उभे रहा. वेळ प्रत्येकाची येत असते या सुडाच्या राजकारणात आम्ही आपल्या सोबत आहोत. जनता महागाईने होरपळत असताना सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास सरकारला रस राहिला नाही, असेही ते म्हणाले.