नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा...!

Edited by: भरत केसरकर
Published on: July 06, 2023 22:16 PM
views 86  views

सिंधुदुर्गनगरी : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणी पातळी 159.50 पर्यंत भरली असून, कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन अरुणा नदीत चालू होणार आहे. दि. 6 जुलै 2023 रोजी पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये. सावधानता बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा आंबडपालचे मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उप कार्यकारी अभियंता अभय मगरे यांनी दिला आहे.